शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मराठी विभागाच्यावतीने कथा निर्मिती संकल्पना या विषयावर अभ्यागत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून काकासाहेब चव्हाण महाविद्यालयातील मराठीचे प्रा. डॉ. राजेंद्र लादे उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात कथेची निर्मिती कशी होते. कथानिर्मितीसाठी आवश्यक घटक, कथानिर्मितीतील उत्स्फूर्तता व कथानिर्मितीच्या क्षेत्रात विद्यार्थ्याना असलेल्या रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ उज्ज्वला पाटील होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात साहित्य हा समाज मनाचा आरसा असून समाजातील घडणाच्या अनेक घडामोडीचे चित्रण आणि त्याचा मानवाशी असलेला संबंध यातून साहित्य निर्मिती होत असते . सकस साहित्य निर्मिती नेहमीच चांगल्या समाज उभारणीसाठी उपयुक्त असते. कथा हा वाङ् मयप्रकार यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी मराठी विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दयानंद कराळे यांनी केले तर आभार मराठी विभागाचा विद्यार्थी अक्षय घाडगे यांनी मानले.
Sunday, January 8, 2023
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मराठी विभागात अभ्यागत व्याख्यान संपन्न.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. ०१/०४/२०२३ ते १३/०५/२०२३ य...
-
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. ०१/०४/२०२३ ते १३/०५/२०२३ य...
-
वि. वा. शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या प्रती सदभावना व्यक्त...
-
संतचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी।असे संत नामदेवांनी लिहिले व त्यातून संतांबद्दलचा आदर व्यक्त केला.संत म्हणजे साक्षात देव. संत...
No comments:
Post a Comment