Thursday, October 6, 2022

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात वाड्.मयमंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

        शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात भाषा विभागाच्यावतीने वाड्.मय मंडळ व 'शब्दगंध' भित्तिपत्रिकेचे उद्घाटन वेणूताई चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.  जी.  जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्र.  प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते.

        प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. एल. जी. जाधव म्हणाले की, प्रचंड वाढती स्पर्धा आणि मोबाईलमुळे आलेले एकाकीपण तरुण पिढीला नैराश्यग्रस्त करीत आहे तरुणांनी मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावा. जीवनातील निराशा दूर करण्याचे सामर्थ्य साहित्यात आहे. साहित्य हे मानवी जीवनाचा आरसा आहे.  तेव्हा कोणतीही कथा, कादंबरी, कविता वा नाटक आपण समरसतेने, तल्लीन, एकरूप होवून वाचल्यास आपणास आनंद मिळतो म्हणून विद्यार्थ्यांनी वाचनाबरोबरच साहित्याच्या निर्मितीकडेही वळाव यातूनच एखादा नवा साहित्यिक जन्माला येवु शकतो. 

          तर अध्यक्षीय मनोगतात प्र.  प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले की, शब्दांच्या पावसात भिजलात तर नवीन शब्दांचे अंकुर फुटतील, नवीन साहित्य निर्मिती होऊ शकेल. या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ.यू. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले.  पाहुण्यांचा परिचय  प्रा. रत्नाकर कोळी यांनी व आभार प्रा. विश्वनाथ सुतार यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सविता येवले यांनी केले. 






 




No comments:

Post a Comment

सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

      शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. ०१/०४/२०२३ ते १३/०५/२०२३ य...