Wednesday, November 4, 2015

वाड्. मय मंडळ उद्घाटन

       शिक्षण महर्षि बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने वाड्. मय मंडळ उद्घाटन व शब्दगंध भित्तिपत्रिकेचे अनावरण प्रमुख पाहुणे डॉ. महेश  गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे. एस. पाटील होते. यावेळी मार्गदर्शन करताना मा. प्रा डॉ महेश गायकवाड म्हणाले की, मराठी भाषा आणि साहित्य हे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात व जीवनात व्यापून राहिले आहे. मराठी साहित्य हे विविधतेने नटलेले आहे. त्यामुळे एक सृजनशील लेखक म्हणून मी सांगू इच्छितो की, आजच्या तरुण पिढीला आठवड्याला एक तरी पुस्तक वा ग्रंथ वाचणे आवश्यक आहे. पुस्तके आपले मित्र आहेत आणि ते आपल्याला खुणावत असतात. आपली बौद्धिक संपदा वाढवण्यासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी जास्तीत जास्त प्रमाणात वाचन केले पाहिजे. साहित्य हे काही आपल्या पासून वेगळे नाही. शब्द आणि त्याचे नेमके अर्थ कळाले की आपण आपोआपच त्याकडे आकर्षित होत जातो. म्हणून समजून घेऊन साहित्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा.





No comments:

Post a Comment

सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

      शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. ०१/०४/२०२३ ते १३/०५/२०२३ य...